इतिहासाची पुनरावृत्ती अशक्य नाही - रामकृष्ण अभ्यंकर (लेखक)

 


      सुमारे १००० वर्षांपूर्वीचा भारताचा नकाशा हल्लीच्या पेक्षा खूप वेगळा नक्कीच होता. काबुल, कंदहार, अफगाणिस्तान, बलुचीस्तान पासून श्रीलंका आणि पूर्वेकडे अगदी इंडोनेशिया, कंबोडिया, म्यानमार आदि सारा प्रदेश अखंड भारतात समाविष्ट होता. आजही त्याच्या  स्मृति / अवशेष / निशाणी त्याची साक्ष देतात. परंतु मध्यंतरीची कठोर धर्मांधता / सत्ता पिपासू वृत्ती व क्रूरता  इत्यादीच्या अति हव्यासापोटी ह्या अखंड हिंदुस्तानची अनेक शकले झाली हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे.
    धर्म / पंथ इ. बाबी हल्ली प्रकर्षाने जाणवत असल्या तरी सारी पौर्वात्य संस्कृती एक असून पाश्चिमात्य संस्कुतीपासून ती बरीच वेगळी आहे. तो सामाईक धागा पकडून पुन्हा सारे एकदिलाने एकत्र येऊ शकतात. इतिहासाची पुनरावृत्ती होऊन अखंड हिंदुस्तान बनू शकतो, अर्थात त्यासाठी विचारांची व योग्य कृतीची पावले पडायला हवीत. अथक परिश्रम, सातत्य, विचारांची देवाण घेवाण सतत आपापसात व्हायला हवी. हे एका रात्रीत अखंड भारताचे दिवास्वप्न प्रत्यक्षात होणारे नसले तरी कालांतराने का होईना अशक्य  देखील नाही असा विश्वास वाटतो. 
 - रामकृष्ण अभ्यंकर



ध्वनीचित्रफित - पराग कुलकर्णी
https://www.instagram.com/tv/CD4QKqkngUG/?igshid=17no9f6cyf118


Popular posts
खेड एस.टी. आगाराचा मनमानी कारभार ! लोटे पंचक्रोशीतील प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे हाल !! लोकल फेरीसाठी साध्या बसऐवजी शिवशाही बस प्रवाशांच्या माथी !
Image
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत अखंडीत वितरीत होणारे लोक निर्माण मराठी ई-वृत्तपत्र
Image
भूमी पॉटरी  ला ना.आदिती तटकरे यांनी दिली भेट* महिला उद्योजिका रसिका दळी यांच्या कलेतून साकारलेल्या व्यवसायाचे केले कौतुक
Image
श्रीमती गीता चंद्रकांत रिकामे यांचे निधन
Image
लाेकनिर्माण पत्रकार टीमतर्फे चिपळूणातील मुख्य कार्यालयात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी
Image