राजापूर /लोक निर्माण ( सुनील जठार)
राजापूर तालुक्यातील भालावली येथील दोन विद्यार्थिनींवर हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये एका मुलीचा मृत्यू झाला आहे. जखमी मुलीला रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाकडे हलवलं आहे. तीक्ष्ण हत्याराने मुलींवर प्राणघातक हल्ला झाला. दोन्ही विद्यार्थिनी नजीकच्या महाविद्यालयातून घरी जात असताना हा हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.