निसर्गाने केले बहाल मानवास सारे
परोपकार करुनी सुखाने जगा रे
संदेशही मोलाचा हा दिला
मानवाने निसर्गालाच छेदीला
निसर्गाची शक्ती असे अदभूत
एकवटले सृष्टीत पंचमहाभुत
मनोहारी, नयनरम्य जे पडे दृष्टीत
सर्व असे निसर्गरुप ईश्वरनिर्मित
मानव मानवातच युध्द छेडीले
मानवतेलाच अाता ठार केले
वनतृण, महावृक्ष कापुन टाकले
सिमेंट काॅंक्रेटचे बन बनवले
सुंदर निसर्गाला केले बकाल
निसर्ग कोपे मग पडे अकाल
कधी होई भुकंप कधी तुफान
निसर्गक्रोध अति होवुनी बेभान
माणसाचे गळुन पडे मग अवसान
उत्कर्ष मानवाचा चकनाचुर होईल
विध्वंसक शस्रअस्र कधीतरी
एकदिवस सारे लयास जाईल
कदाचीत जगही नष्ट होईल
कोरौनासम जीवही मानवानेच निर्मिले
सर्व जगालेच त्याने गिळीले
जरी चंद्रावरही ठेविले पाउल
मंगळालाही कब्जात कधीतरी घेईल
निसर्गाच्या पुढे माणुस तरीही पडतो थिटा
वृक्षसंवर्धन करुनी निसर्गाला जपा
"पर्यावरणाचा तोल सावरा"
मंत्र हाच अाज ठरतो खरा.
रामदास गायधने
नवीन पनवेल