जर अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ६००० रुपये जमा झाले असतील तर ते परत घेतले जाणार आहेत. असे न केल्यास FIR दाखल केली जाणार!

 





 नवी दिल्ली/लोकनिर्माण न्युज 


       देशभरातील विविध ठिकाणी मोदी सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असणाऱ्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेमध्ये घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. तमिळनाडू ते उत्तर प्रदेशमधील बाराबंकी आणि मिर्झापूर याठिकाणाहून मोठे घोटाळे समोर आले. दरम्यान ही प्रकरणं समोर आल्यानंतर सरकारने काही कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. ज्या शेतकऱ्यांनी किंवा इतर व्यक्तींनी अपात्र असून देखील या योजनेतील पैशांचा लाभ घेतला आहे, त्यांच्याकडून पैसे परत घेतले जातील. असे न केल्यास सरकारी पैसे परत मिळवण्यासाठी कृषी विभागाकडून संबंधित व्यक्ती विरोधात एफआयआर दाखल केली जाईल.


      गेल्या महिन्यातच असे समोर आले होते की, यूपीमधील बाराबंकी याठिकाणी पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेत मोठा घोटाळा झाला आहे. अडीच लाख अपात्र नागरिकांना या योजनेचा फायदा मिळाला आहे. प्रशासनाकडून ही रक्कम परत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.




Popular posts
रत्नागिरीत राष्ट्र सेवादल व्यक्तिमत्व विकास शिबीर
Image
पनवेल प्रेस क्लब संस्थेच्या अध्यक्षपदी देविदास गायकवाड यांची निवड
Image
बांद्रा शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांतर्फे सरकारचे आभार मानण्यासाठी सभा संपन्न मा.आ.श्री.किरण पावसकर ( शिवसेना सचिव/प्रवक्ते) यांनी उपस्थित सर्व रहिवासी कर्मचाऱ्यांना केले मार्गदर्शन
Image
देवरुखात जागतिक महिला आणि कामगार दिन संयुक्तिक होणार साजरा! आणि लोकनिर्माण चे डिजिटल माध्यमात होणार पदार्पण
Image
महाराष्ट्र ज्ञान महामंडळतर्फे कृत्रिम बुद्धिमत्ता समाविष्ट करून कोर्सचे अपग्रेडेशन — डिजिटल व AI Divide दूर करण्याचा निर्धार
Image