जिल्ह्यात हातपाटी वाळू उत्खननास परवानगी मात्र वाळूच्या उत्खननासाठी परवाने देणे आणि दर निश्‍चित करण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हा खनिकर्म विभागाने शासनाकडे केला सुपूर्द!

 


रत्नागिरी / लोकनिर्माण (सुनील जठार)
जिल्ह्यात हातपाटी वाळू उत्खननास परवानगी देण्यात आली आहे. महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने जिल्ह्यातील चार खाट्यांचे सर्व्हेक्षण पूर्ण केले आहे. यामध्ये ६लाख २९ हजार ३५७ ब्रास वाळू काढण्यास योग्य असून तशी परवानगी दिली आहे. मात्र वाळूच्या उत्खननासाठी परवाने देणे आणि दर निश्‍चित करण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हा खनिकर्म विभागाने शासनाकडे पाठविला आहे.


     जिल्ह्यातील आंजर्ला खाडीतील ३गट, दाभोळ, जयगड आणि काळबादेवी या तीन खाड्यामधील प्रत्येकी एक गट अशी एकूण ६ हातपाटी गट आहेत. यात ६लाख २९ हजार ३५७ ब्रास वाळू उपसाला मेरीटाईम बोर्डाकडून परवानगी देण्यात आली आहे. यासाठी वाळुच्या उत्खननसाठी आता दर निश्‍चित करण्यात येणार आहे.