दसर्‍यानंतर राज्यात सर्व जिल्ह्यांत महावितरण कंपनीच्या जिल्हा कार्यालयांना टाळे ठोकणार- राजू शेट्टी यांचा इशारा


मुंबई /लोकनिर्माण न्युज 
      दरमहा ३०० युनिटस्च्या आत वीज वापर असणार्‍या राज्यातील सर्व घरगुती वीज ग्राहकांची लॉकडाऊन काळातील ६ महिन्यांची संपूर्ण वीज देयके माफ करावीत व त्या रकमेची भरपाई राज्य सरकारने करावी, या मागणीसाठी दसर्‍यानंतर राज्यात सर्व जिल्ह्यांत महावितरण कंपनीच्या जिल्हा कार्यालयांना टाळे ठोकण्यात येणार आहे, अशी माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली.