विजेंच्या गडकगडाटासह अचानक पडलेल्या जोरदार पावसामुळे गावातील बत्ती झाली गुल, ग्रामस्थांचे झाले अंधारात हाल.

 


महाड/ लोकनिर्माण न्युज (निळकंठ साने)


ता. महाड, जि: रायगड  येथे गेल्या रविवारी अचानक पडलेल्या जोरदार पावसामुळे, शेतात असलेल्या मुख्य विधुत वाहिनीवर वीज कडाडली व गावातील वीज खंडीत झाले,  गावच्या इलेक्ट्रिक डी.पी. वर वीज कोसळून डीपी जळली होती. त्यामुळे रविवार, सोमवार, मंगळवार या ३ दिवस गावात लाईट नव्हती. ह्यात कोणते ही जीवितहानी नाही झाली परंतु ग्रामस्थ आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागला. 
    लाईट नसल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा फार मोठा नुकसान झाला व मोबाईल सुद्धा चार्ज नसल्यामुळे गावात कोणाचा फोन ही लागत नव्हता. अशा वेळेस गावातील शहाजी मोरे, बळीराम कदम यांच्याशी संपर्क साधल्यानंतर, श्री. विलास म्हामुणकर ह्यांनी माननीय आमदार श्री. भरतशेठ गोगावले ह्यांना ह्या संदर्भात सुचना दिल्या, साहेबांच्या मार्गदर्शनाखालील, श्री. विलास म्हामुणकर ह्यांनी
वीज अधिकाऱ्यास फोन करून त्यांना सर्व परिस्थितीची माहिती देऊन लवकरात लवकर डीपी बदलण्याची विनंति केली.


       
    त्यामुळे मंगळवारी रात्री ८:३० वाजता, डीपी चे काम  करण्यासाठी, विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी कर्मचारी प्रयत्न करत होते, काम पूर्ण होऊन गावात लाईट आली.
तातडीने पाठपुरावा करून हे काम पूर्ण करण्यात आले, ह्यात श्री. पवन कुमार (वायरमन), श्री. बोराटे साहेब (सहाय्यक अभियंता) बिरवाडी, श्री. खांडेकर साहेब (कार्यकारी अभियंता), तसेच वी. वी. शिंदे, ए.जी. गावीत, के. एम. कदम, एन. एच. काशीद, पी. ए. खाजुरे, एस. के. सोनावले सह अन्य विधुत कर्मचारी उपस्थित होते, श्री. विलास म्हामुणकर यांच्या पाठपुरावा मुळे सर्व ग्रामस्थांनी आभार मानले व तसेच श्री. शहाजी मोरे, श्री. बळीराम कदम, श्री. मिलिंद मोरे ह्या सर्वांचे ही आभार हनुमान सेवा ग्रामविकास मंडळ (खरकवाडी) ह्या ग्रामस्थांनी केले. तसेच थ्री फेस संदर्भात आपल्या खरकवाडी गावातील लाईट ही सिंगल फेस वर असल्यामुळे, सप्ताह काळात तसेच सोमजाई देवी पालखीच्या काळात डीपी वर लोड येतो, त्यामुळे गावातील लाईट डीम होते आणि गावातील पाण्याचे पंप चालवितांना सुद्धा हवा तसा फोर्स मिळत नाही.


        विलास म्हामुणकर यांनी गावातील सरपंच श्री. द्वारकानाथ जाधव सर यांच्याशी चर्चा केली, या संदर्भात गावाच्या वतीने, श्री. बळीराम कदम हे पत्र लिहिणार आहेत, त्यांच्या सोबत आंब्याचामाळ गावातील,  सुभाष मोरे यांच्यासह,  ग्रामस्थांशी चर्चा करून, सोबत सरपंचांकडून ही एक पत्र घेऊन, अलिबाग (गोरेगाव) येथील इलेक्ट्रिक अधिकाऱ्यांकडे विनंती अर्ज करण्यात येणार आहे. अशी संपूर्ण माहिती आम्हाला श्री.  विलास म्हामुणकर सह समस्त ग्रामस्थ ह्यांनी दिली आहे.