.महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा अध्यक्ष  जितेंद्र चव्हाण यांनी घेतली जिल्हा आरोग्य अधिकारी यांची भेट

रत्नागिरी /लोकनिर्माण (सुनील जठार ) 


     महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डाॕ.बी.एस.कमलापूरकर, डाॕ.इंद्रायणी जाखर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांची भेट भेट घेतली.


         
      या भेटी समयी लांजा तालूक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील विविध प्रश्नांवर तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकांम खात्याच्या कामास्वरुपात,तसेच अनेक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली व प्रामुख्याने भांबेड याठिकाणी सर्पदंशाने मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या संबंधित प्रश्नावर चर्चा करण्यात आली.लवकरच प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या सेवा कार्यात बदल होईल असे सांगून वरील प्रश्नावर चौकशी समिती नेमण्यात आली आहे असे सांगण्यात आले.
    जिल्हा अध्यक्षांसह तालूका अध्यक्ष सचिन साळवी, सह संपर्कअध्यक्ष मनविसे किरण रेवाळे, सहसंपर्क अध्यक्ष अनंत सूद,सचिव संदीप मेस्त्री,उप ता.अध्यक्ष प्रमोद इंगळे,गुरु चव्हाण* इत्यादी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.