बिबट्याच्या धाकामुळे सायंकाळनंतर घराबाहेर पडणे झाले धोक्याचे, नागरिक एकवटले

 

राजापूर/लोकनिर्माण (सुनील जठार)

राजापूर येथील नायब तहसिलदार व भटाळीतील (समर्थनगर) रहिवाशी सौ. दीपाली पंडित यांच्यावर बिबट्याने हल्ला करून जखमी केल्यानंतर स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली आहे. सायंकाळनंतर घराबाहेर पडणे धोक्याचे झाल्याने या बिबट्याला पिंजर्‍यात जेरबंद करून सुरक्षित ठिकाणी सोडावे, अशी मागणी नागरिकांच्या एका शिष्टमंडळाने राजापूर वनविभागाकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

सद्यस्थितीतील राजापूर शहर व परिसरामध्ये बिबट्याचे नागरिकांना वारंवार दर्शन होत आहे. त्यातही प्रामुख्याने भटाळीतून कोर्टाकडे वर जाणारा रस्ता व पुढील बाजूला स्मशानभूमीकडून गुरववाडीत जाणारा रस्ता येथे प्रामुख्याने त्याचा वावर लक्षात येत आहे.