कोयनेत धरणग्रस्तांच्या आंदालनास वाढता पाठिंबा, धरणग्रस्तांच्या खांद्याला खांदा लावून लढू -हर्षद कदम

 

पाटण / लोकनिर्माण प्रतिनिधी 

कोयनानगर ता. पाटण येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर श्रमुदचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या धरणग्रस्तांच्या आंदोलनाची धार दिवंसेदिवस तीव्र होताना दिसत आहे, आंदोलनास विविध पक्ष, संघटनांकडून आंदोलन स्थळी भेट देऊन पाठींबा दिला जात आहे. 



शनिवारी आंदोलनाच्या सहाव्या दिवशी शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाचे सातारा जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह आंदोलन स्थळी भेट देऊन जाहिर पाठींबा व्यक्त करून धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर खांद्याला खांदा लावून लढू असे आश्वासन दिले. 

यावेळी धरणग्रस्तांशी संवाद साधताना हर्षद कदम म्हणाले आम्ही प्रकल्प ग्रस्तांच्या सोबत आहोत,धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर खांद्याला खांदा लावून लढू, मी तालुक्याचा सुपूत्र आहे, 1962 पासुन दिर्घ काळ हा लढा सुरू आहे, आपण छत्रपतींचे मावळे आहोत,लढणे आपल्याला माहित आहे,धरणग्रस्तांच्या आज तीन पिढ्या गेल्या, चौथी पिढी आंदोलनात आहे, प्रशासनाने वेळोवेळी हुलकावणी दिली,यामुळे बेरोजगार होऊन धरणग्रस्तांची पोर उदरनिर्वाहासाठी मुंबईत गेलीत, महाविकास आघाडी सरकारच्या अडीज वर्षांच्या काळात तात्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब वेळोवेळी बैठका घेत होते, डॉ. भारत पाटणकर यांच्या कडून माहिती घेत होते, मात्र आठ महिने झाली आताचे मुख्यमंत्री स्वतः धरणग्रस्त असूनही यांना वेळ मिळाला नाही, मुख्यमंत्री अलिशान गाड्यातून आलेल्यांना वेळ देतात मात्र धरणग्रस्तांना वेळ देत नाही, आता धरणग्रस्तांनी आक्रमकपणा धारण केला  पाहिजे, इथल्या बेरोजगार तरुणांच्या मतावर लोकप्रतिनिधी निवडुन येतात, त्यांनी हे काम केले पाहिजे, प्रशासकीय अधिकारी काम करत नाहीत, देशात राज्यात मोठे मोठे प्रकल्प उभे राहिले ते आपल्या धरणग्रस्तांचे त्यागातून  उभे राहिले आहेत , आपल्याला संघर्ष अटळ आहे, या लढाईत सर्व आम्ही सर्व शिवसैनिक धरणग्रस्त आंदोलकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे त्यांनी म्हटले.

  तालुकाप्रमुख सुरेश पाटील म्हणाले   धरणग्रस्तांना आंदोलन करण्याचा गरज लागली नाही पाहिजे होती, उघड्या डोळ्याने कोयना धरणग्रस्तांचे हाल पाहू शकत नाहीत,

आंदोलकांनी आता आक्रमक होऊन  शासकीय कार्यालयास टाळे ठोकले पाहिजेत, त्या शिवाय सरकारचे डोळे उघडणार नाही. ठाकरे गट धरणग्रस्त आंदोलकांच्या पाठीशी कायम राहिली असे सांगून पाठींबा दर्शवला. 

दरम्यान यावर कोणाकडून फक्त आश्वासन नको तर कृती हवी असे सचिन कदम यांनी सागितले, तसेच सरकार स्थापन झाल्यानंतर बैठकीला मुख्यमंत्री यांना पत्र दिले मात्र अद्यापही 7,8 महिने झाले मात्र जिल्ह्याचे भुमिपुत्र असलेल्या मुख्यमंत्र्यांकडे स्वतःच्या जिल्ह्यातील धरणग्रस्तांच्या साठी वेळ मिळाला नाही, हे दुर्दैव म्हणावे लागेल अशी खंत श्रमिक मुक्ती दलाचे संघटक सचिन कदम यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. 

यावेळी गजानन कदम,श्रीपती माने यांनी धरणग्रस्तांच्या वेदना मांडल्या.

यावेळी महेश शेलार,सिताराम पवार, राजाराम जाधव, आनंद ढमाल, परशुराम शिर्के, दाजी पाटील, बळीराम कदम, संजय कांबळे, कमल कदम, अक्षय कदम, यांच्या सह धरणग्रस्त उपस्थित होते. 

"बॅनरबाजी करून कुणी फुकटचे श्रेय घेऊ नका"- हर्षद कदम 

धरणग्रस्तांचे प्रश्नांचा गाढा अभ्यास असणारे डॉ. भारत पाटणकर अनेक वर्षांपासून धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर लढत आहेत  ते त्यांचे श्रेय आहे, मात्र कुणी बॅनरबाजी करून ते श्रेय घेण्याचा फुकटचा प्रयत्न करू नये , खरोखर श्रेय घ्यायचे असेल तर धरणग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी पाठपूरावा करा असा उपरोधिक टोला हर्षद कदम यांनी यावेळी लगावला.

Popular posts
खेड एस.टी. आगाराचा मनमानी कारभार ! लोटे पंचक्रोशीतील प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे हाल !! लोकल फेरीसाठी साध्या बसऐवजी शिवशाही बस प्रवाशांच्या माथी !
Image
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत अखंडीत वितरीत होणारे लोक निर्माण मराठी ई-वृत्तपत्र
Image
भूमी पॉटरी  ला ना.आदिती तटकरे यांनी दिली भेट* महिला उद्योजिका रसिका दळी यांच्या कलेतून साकारलेल्या व्यवसायाचे केले कौतुक
Image
श्रीमती गीता चंद्रकांत रिकामे यांचे निधन
Image
लाेकनिर्माण पत्रकार टीमतर्फे चिपळूणातील मुख्य कार्यालयात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी
Image