पुणे/लोकनिर्माण (विनायक दोरगे)
उरूळी कांचन भागातील एका शेठजीने पुणे जिल्ह्यातील मोठ मोठे भांडवलदार व्यापारी बागायतदार यांना कमीत कमी पन्नास कोटी रूपयाचा गंडा घालत सहकुटुंब फरार झाला आहे.
एक लाख ते पंचवीस लाख असे लाखो रुपयांचा दर महा भिशी भरणा सुरू असणारे पाचशे पेक्षा जास्त गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचे समजत आहे. मात्र भिशी भरणा करणाऱ्या गुंतवणूकदारांपैकी फक्त पाच जणांनी लोणी काळभोर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवली आहे.
गुंतवणूकदारांचे असे झाले आहे की तोंड दाबून बुक्क्यांचा मार ..
फसवणूक केलेल्या शेठने पुर्वीपासुन एक ते तीन वर्षाच्या भिश्या अधी प्रमाणिक पणे चालवल्याने लोकांनाचा विश्वास संपादन केला व अचानक आपला गाशागुडांळत पोबारा केल्याची चर्चा उरूळी कांचन परिसरात सुरू आहे ..
कोरोना पार्श्वभूमीवर लॅकडाऊन सुरू झाल्यामुळे भिशीचा जोरात सुरू असलेला धंदा मंदित आला. त्यात भरणा करणारे व्यापारी उदयोगधंदे बंद असल्या कारणाने भरणा वेळॆत करू नशकल्याने शेठजी चा पुढील भिशींचा भरणा थकु लागल्याने गुंतवणुकदारांचा तकादा मागे लागला पुढील परिस्थितीची चाहुल लागताच शेठजीनी आपला गाशा गुंडाळून सहपरिवार फरार झाला आहे..
पुणे ते हवेली. दौंड भागातील बडे व्यापारी बागायतदार मोठ्या संख्येने अडचणीत आल्याची चर्चा सुरू झाली आहे ...
पुढील तपास लोणी काळभोर पोलिसस्टेशनचे पोलिस अधिकारी करत आहेत.